शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा — आप”चे काटोलमध्ये चक्का जाम आंदोलन!
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह २२ प्रमुख मागण्यांसाठी नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनाला आम आदमी पार्टीने पूर्ण पाठिंबा दिला आहे.
या समर्थनार्थ आज काटोल–नागपूर रोडवर आम आदमी पार्टीच्या वतीने सुमारे तीन तासांचा चक्का जाम आंदोलन** करण्यात आला.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आणि सरकारकडे मागणी केली की —
शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कर्जमुक्त करावा,
पिकांना योग्य दर मिळावा,
तसेच मत्स्यव्यवसायिक आणि मेंढपाळ समाजाला न्याय द्यावा.
नागपूरमध्ये विविध शेतकरी संघटनांकडून चालविण्यात येत असलेल्या शेतकरी आंदोलनात २२ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये —
➡️ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय,
➡️ कृषी उत्पादनांना हमीभाव मिळावा,
➡️ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी — अशा महत्त्वाच्या मागण्या आहेत.
या मागण्यांच्या समर्थनार्थ आम आदमी पार्टी, नागपूर ग्रामीण इकाईतर्फे जिलाध्यक्ष वृषभ वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली काटोल येथे हा चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आला.
या आंदोलनात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. प्रमुख उपस्थिती — सुनीलदादा वडस्कर, राजेंद्र ठाकरे, केतन वानखेडे, ऋषभ गेडाम, निलेश पेठे, केवल तुमडाम, आशीष पोतदार, गणेश खरबडे, अनिल पोतदार, उत्तम वर्धे, समीर गायकवाड, यश बागडे, महिपाल गेडाम, गजानन धोटे, प्रफुल ठाकरे आणि इतर अनेक शेतकरी.
या चक्का जाम आंदोलनाद्वारे **आम आदमी पार्टीने स्पष्ट केले की ती शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी कटिबद्ध आहे.






