spot_img
spot_img
spot_img
spot_img

शेती, उद्योग आणि समाजकारण – तिन्ही क्षेत्रांचा संगम

परांडा तालुक्यात सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे हरिचंद्र बापू मिस्कीन.

शेती, उद्योग आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात सक्रीय सहभागातून त्यांनी अल्पावधीतच नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव संभाव्य उमेदवारांमध्ये घेतले जात आहे. मात्र, पद नसतानाही लोकांसाठी काम करण्याचा त्यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य ठरते.

 

शेतीतून समाजसेवेपर्यंतचा प्रवास

 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हरिचंद्र बापू मिस्कीन यांनी शेतीसोबतच उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. सिंचन, पिकविमा, शेतीउत्पन्न वाढ, यांसारख्या विषयांवर त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन केले.

तसेच, तरुणांनी शहरांकडे न धावता उद्योजकतेकडे वळावे, यासाठी ते प्रेरणा देतात.

“पद नसतानाही जनसेवेचा वसा”

 

राजकीय पद नसतानाही समाजकारणाला आयुष्य अर्पण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. महिला बचतगटांना आर्थिक मदत, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, रुग्णांना औषधोपचारासाठी मदत -अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी लोकांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

 

त्यांच्या कार्यामागे माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांचे मार्गदर्शन असल्याचे नागरिक सांगतात.

 

साधेपणातून उभा राहिलेला आत्मीयतेचा बंध

 

बापू मिस्कीन यांचा साधा, मनमिळावू आणि आपुलकीचा स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे.

कोणत्याही संकटाच्या वेळी ” तो माझा माणूस आहे’ अशी भावना त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होते.

 

त्यांचे ब्रीदवाक्य स्पष्ट आहे – “समाजहित प्रथम”.

 

सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग

 

वृक्षारोपण, जलसंधारण, रक्तदान, पर्यावरण संवर्धन, विद्यार्थी मार्गदर्शन, आपत्तीग्रस्तांना मदत अशा सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो.

 

त्यांची कार्यशैली घोषणांपेक्षा कृतीवर आधारित असल्यामुळे नागरिक त्यांना कर्मवीर समाजसेवक म्हणतात.

परांडाकरांचा विश्वास आणि अपेक्षा

 

आगामी स्थानिक निवडणुकांच्या चर्चेत त्यांचे नाव घेतले जात असले तरी हरिचंद्र बापू मिस्कीन यांनी कोणतीही राजकीय आकांक्षा व्यक्त केलेली नाही. तरीदेखील, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि समाजसेवेच्या वृत्तीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे.

 

“अशा तरुण कार्यकर्त्यांची गरज तालुक्याला आहे” असे मत अनेक स्थानिक नागरिक व्यक्त करतात.

 

*नव्या पिढीतील समाजकारणाचा आदर्श

 

हरिचंद्र बापू मिस्कीन हे केवळ नाव नाही, तर सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाची नवी दिशा आहे. त्यांचा प्रवास परांडा तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून –

स्वतः साठी नव्हे, समाजासाठी जगणं’ या विचारांची जिवंत प्रचीती ते देतात.

 

दक्षता न्यूज परांडा प्रतिनिधीः नवनाथ लहू गाडगे

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!