*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*
मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी या विद्यालयातून एकूण २४६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते.त्यापैकी १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ इतकी आहे आणि चि.आदित्य दिपक म्हेत्रे हा विद्यार्थी १५३ गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आलेला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री सचिन देशमुख, श्री सुरेश डिसले, श्री संग्राम देशमुख व श्री सुजित लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.बी.वाय. यादव साहेब,उपाध्यक्ष मा.श्री.नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.पी.टी. पाटील साहेब,सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य मा.श्री.अरुणजी देबडवार सर,खजिनदार मा.श्री.जे.सी. शितोळे बापू,शाळा समिती सदस्या मा.डॉ.सौ.मीराताई यादव मॅडम, शाळा समिती सदस्य मा.श्री.शेळवणे बापू, संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे सर,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे मॅडम, पर्यवेक्षक श्री.मदने के.जी.सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.*
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






