spot_img
spot_img
spot_img
spot_img

हत्तुर ता. दक्षिण सोलापूर येथे मारुती निरवणे यांचे घर संपूर्णपणे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक माहिती गावातील श्रींकात भरले व काही प्रतिष्ठित व्यक्ती यांनी मला फोनवरून दिली. ही बातमी समजताच क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. निरवणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, धीर दिला व घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.

 

कष्टाची पराकाष्ठा करून उभारलेला संसार, घरातील सोनं-नाणं, जमा केलेला पैसा आणि आयुष्यभराची स्वप्नं… डोळ्यासमोर काही क्षणात जळून खाक होताना पाहताना कोणाच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत तरच नवल.

एवढ्या दिवसांचा थाटलेला घर-संसार क्षणात राखरांगोळी होतो, त्या असह्य वेदना मारुती निरवणे यांचे चिरंजीव यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या शब्दांतून आणि डोळ्यांतून प्रकर्षाने जाणवत होत्या.

 

या भीषण घटनेत हत्तुरच्या ग्रामदैवतेची कृपा म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही, याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच घटनेची तात्काळ माहिती मला फोन करून दिल्याबद्दल ग्रामस्थांचे विशेष आभार मानतो.

 

या कठीण प्रसंगी निरवणे कुटुंबीय एकटे नाहीत, हे ठामपणे सांगत येत्या काळातही फाउंडेशन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास देत त्यांच्या मानसिक मनोबलाला आधार देण्याचा प्रयत्न केला.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!