मंत्रालय – मुंबई – 11 नोव्हेंबर 2025
माझ्या माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील 21 गावांना संपूर्णपणे दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्वपूर्ण अशी असलेली औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) नामदार मा.श्री. राधाकृष्ण विखे – पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत औंध उपसा सिंचन योजनेच्या निविदाबाबत आणि सोलापूर जिल्ह्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाबाबत आढावा घेत,सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी या दोन्ही योजनेचे उपरोक्त सर्व विषय मार्गी लागतील अशा पाद्धतीने त्वरित कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
औंध उपसा सिंचन योजना खटाव तालुक्यातील औंधसह 21 गावांच्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी, आणि रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणारी महत्त्वाची योजना असून, या योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेची कामे जलदगतीने पूर्ण होऊन लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत तिचा फायदा पोहोचावा, यासाठी राज्य शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






