श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात — “प्रत्येक शेतकऱ्याचा उस गाळप होईपर्यंत कारखाना सुरूच राहील”
पंढरपूर (दि. २९ ऑक्टोबर २०२५):
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ चा गळीत हंगाम मोळी पूजनाने विधिवत सुरू झाला.
या पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या हस्ते पार पडला, तर कारखान्याचे काटापूजन संचालक अशोक तोंडले व संचालक सचिन पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले.
या वर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे कारखान्याकडे गाळपासाठी मुबलक ऊस उपलब्ध झाला आहे. संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी “यंदा उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे”, असे सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी सांगितले की,
“सभासद शेतकऱ्यांचा शेवटचा ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही.”
समारोपात संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांना यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






