spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात — “प्रत्येक शेतकऱ्याचा उस गाळप होईपर्यंत कारखाना सुरूच राहील”

श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात — “प्रत्येक शेतकऱ्याचा उस गाळप होईपर्यंत कारखाना सुरूच राहील”

 

पंढरपूर (दि. २९ ऑक्टोबर २०२५):

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ चा गळीत हंगाम मोळी पूजनाने विधिवत सुरू झाला.

 

या पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या हस्ते पार पडला, तर कारखान्याचे काटापूजन संचालक अशोक तोंडले व संचालक सचिन पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या वर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे कारखान्याकडे गाळपासाठी मुबलक ऊस उपलब्ध झाला आहे. संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी “यंदा उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे”, असे सांगितले.

 

यावेळी उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी सांगितले की,

 

“सभासद शेतकऱ्यांचा शेवटचा ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही.”

 

समारोपात संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांना यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!